Burfi बर्फी-movie review in marathiबर्फी…
.असे सिनेमे फार कमी येतात.
त्यांच्या आनंदात ,वेदनेत सामील होत जातो. त्यांची निरागसता, मनाची निर्मळता…सगळेच आपल्यापर्यंत पोहचते.अनुराग बासुने अफलातून मांडले आहे सगळे.
आपल्यासमोर कलाकार अभिनय करत आहेत….छे. हा विचार शिवतच नाही मनाला इतका जिवंत अभिनय.
बर्फी आणि झिलमिलची प्रेमकथा तीन तास खिळवून ठेवते
. पात्र अधूरे आहेत.पण प्रेमाचा प्रवास पूर्ण आहे.
सिनेमाची सुरूवात फ्लॕशबॕकने होते. श्रुतीच्या (इलियाना) आठवणींपासून सिनेमा सुरु होतो.
तिच्या आठवणीतून बर्फीचे रुप उलगडत जाते.
‘खामोशीमें प्यार खामोश हो जाएगा’
या तिच्या आईच्या वाक्यात
‘खामोशीमेंभी प्यार होता है’
हे वाक्य मागे पडते.तिचे लग्न होते.पण तिच्यात असलेल्या बर्फीला ती मागे सारु शकत नाही,या ना त्या निमित्ताने तो तिच्या आयुष्यात येत राहतो आणि तिच्याबरोबर आपणही त्या वेदनेची अनुभूती घेतो.
रणबीर कपूरचा अभिनय, त्याचे दिसणे सगळेच सिनेमाची जमेची बाजू आहे.
आॕटीस्टिक झिलमिल -श्रीमंत घरची पण आईवडीलांमुळे जगाशी काहीही संबंध न येणारी
बर्फी आणि ती एकमेकांच्या आयुष्यात येतात आणि सुरु होतो नितांत सुंदर प्रेमप्रवास. स्वच्छ,नितळ मनाचा बर्फी आणि निरागस,अजाण झिलमिल. दोघांनाही एकमेकांच्या प्रेमाशिवाय काही नको असते.
प्रेमाला शब्दांची गरज आहे का?
हा प्रश्न हा सिनेमा बघतांना सतत पडत राहतो.
आपण नेहमीपेक्षा पडद्यावर काही वेगळे बघत आहोत याची जाणीव सिनेमा सुरु झाल्याबरोबर होते.
आयुष्य आनंदी जगण्यासाठी फार कमी गोष्टींची निकड असते. बस त्या गोष्टी कोणत्या हे आपल्याला कळायला हवे.
सिनेमातील काही चटका लावणारी दृश्ये.
सहा वर्षानंतर श्रुती आणि बर्फी भेटतात.बर्फी झिलमिलच्या प्रेमात पडलाय हे तिच्या लक्षात येते.
त्या दोघांच्या नात्यासोबत ती तिच्या आणि रणजितच्या (तिचे पती) नात्याची तुलना करते.
मै और रणजीत बात तो करते थे
पर दिल खामोश थे।
बर्फी अधूरा था पर पूरा था।
श्रुतीच्या मनात द्वंद्व सुरु असते.
झिलमिल घरी परत येते.बर्फी तिच्या घरी येऊन वेड्यासारखा तिला शोधतो.ती कुठेही दिसत नाही.तो परत जायला निघतो. झिलमिल बर्फी बर्फी … असा आवाज देते.बर्फीपर्यंत आवाज पोहचणे शक्य नसते.सोबत असलेल्या श्रुतीला झिलमिलची साद ऐकू जाते.
बर्फीला सांगायचे कि नाही ही जीवघेणी चलबिचल तिच्या चेहऱ्यावर दिसते.
सिनेमाची गाणी सिनेमाला चार चाँद लावतात.
सगळी गाणी नायकाच्या जिंदादिलीला साजेशी.
एकापेक्षा एक सरस गाणी. संगीत प्रितमचे,
क्यूँ, न हम-तुम
चले टेढ़े-मेढ़े से रास्तों पे नंगे पाँव रे
चल, भटक ले ना बावरे
क्यूँ, न हम तुम
फिरे जाके अलमस्त पहचानी राहों के परे
चल, भटक ले ना बावरे
इन टिमटिमाती निगाहों में
इन चमचमाती अदाओं में
लुके हुए, छुपे हुए
है क्या ख़याल बावरे
गीतरचना- नीलेश मिश्रा
सगळ्या विंवचना सोडून खाचखळगे असलेल्या रस्त्यावरुन मनसोक्त भटकणे.
इत्ती सी हँसी
इत्ती सी ख़ुशी
इत्ता सा टुकड़ा चाँद का
ख़्वाबों के, तिनकों से
चल बनाएँ आशियाँ
गीतरचना स्वानंद किरकिरे
अतिशय तरल गाणे. थोडे हसू,थोडासाच आनंद,चंद्राचा छोटासा तुकडा, छोटे स्वप्न घेऊन एक घर बनवायचे.
ह्या संपूर्ण गाण्यातील सगळे शब्दच जादूभरे.
|
ReplyForward
|
https://marathi.shabdaparna.in/Movie
https://marathi.shabdaparna.in/Song
https://marathi.shabdaparna.in/Bollywood
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे लिखाण पाठवून शब्दपर्ण टीममध्ये सामील व्हा.आमचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज शब्दपर्ण जरुर follow करा.
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/











Wahwa
खूप सुंदर
व्वा! अतिशय छान समीक्षण लिहिले आहे. खरोखर किती सुंदर कलाकृती बनली! सगळ्या कलाकारांनी जबरदस्त अभिनय केला आहे.
सुंदर… लिहिले..
खुप मस्त चित्रपट…. आणि तुझे लिखाण पण ..प्रिती….. मस्तच लिहिले गं
अप्रतिम समीक्षण