सुप्रसिद्ध (हा शब्द खरे म्हणजे कमी भासेल )
शायर साहिर लुधियानवीने लिहिलेली शायरी.
ज्याच्या नावातच जादूगर शब्द दडला आहे त्याच्या शायरीत जादू असणे ओघाने आलेच.
कभी कभी गुलशय रायने लिहिलेली कथा आणि कथेला सिनेमाचे स्वरुप दिले यश चोप्रा यांनी.
सिनेमात योगायोगाने बऱ्याच गोष्टी घडतांना दिसतात.
पूजा(राखी) आणि अमित (अमिताभ) एकमेकांच्या प्रेमात पडतात पण विवाह दुसऱ्यांशी होतो.
अमित शायर आणि पूजा शायरीची दिवानी.
अमित काॕलेजमध्ये हे गाणे गातो. ह्या गाण्यानंतर दोघांची प्रेमकहानी सुरु होते.
पळभर.
हे पुरातन काळासून सांगितलेले सत्य साहिरने त्याच्या शब्दातून सांगितले.आपण ह्या सत्यापासून अनभिज्ञ होतो आणि आताच आपल्याला हे माहित झाले…असा भास होण्याइतपत गाण्यात गुंतत जातो.
येणे आणि जाणे…अनादी काळापासून सुरु असलेला खेळ असाच सुरु राहणार.
पण ते सगळेच थोड्या वेळाचे सोबती .
तसेच माझेही होणार.आज तुमच्यासोबत असलेला मी उद्या तुमच्यापासून विलग होणार
मैं पल दो पल का शायर हूँ
पल दो पल मेरी कहानी है
पल दो पल मेरी हस्ती है
पल दो पल मेरी जवानी है
मैं पल दो पल का…
मुझसे पहले कितने शायर
आए और आकर चले गए
कुछ आहें भर कर लौट गए
कुछ नग़मे गाकर चले गए
वो भी एक पल का किस्सा थे
मैं भी एक पल का किस्सा हूँ
कल तुमसे जुदा हो जाऊँगा
वो आज तुम्हारा हिस्सा हूँ
मैं पल दो पल का…
कल और आएंगे नग़मों की
खिलती कलियाँ चुनने वाले
मुझसे बेहतर कहने वाले
तुमसे बेहतर सुनने वाले
कल कोई मुझको याद करे
क्यूँ कोई मुझको याद करे
मसरूफ़ ज़माना मेरे लिये
क्यूँ वक़्त अपना बरबाद करे
मैं पल दो पल का…









